मुंबई : __ शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले आहे. कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभमीवर राज्यातील औद्योगिक स्थिती जाणून घेण्यासाठी नियुक्त केलेल्या कतिदलाची मंत्रालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव भूषण गगराणी, आरोग्य संचालक तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य मिशन अनुपकुमार, वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई-पुणे यांसारख्या तीव्र कोरोनाबाधित क्षेत्रांना वगळून इतर जिल्ह्यातील उद्योगांना काही नियंत्रणांसह उत्पादन सुरू करता येईल, यावर प्रस्ताव तयार करण्याची सूचना सुभाष देसाई यांनी यावेळी केली. विशेषतः शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू व्हावेत म्हणजे शेतकरी वर्गाला दिलासा मिळू शकेल. कायमस्वरुपी तसेच कंत्राटी कामगारांना काही प्रमाणात उत्पन्न मिळावे, हा दृष्टीकोन प्राधान्याने पुढे ठेवण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी केंद्राकडे करावयाच्या मागण्यांवरही चर्चा झाली. लघुउद्योगांनात्यांच्या कामगारांना किमान दोन महिने पगार देता यावायासाठी बँकांनी कर्जाची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, याबाबत केंद्र शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आलीराज्यातील यंत्रणांनी वीज व पाण्याच्या प्रत्यक्ष वापराचीच चाच देयके आकारावितएमआयडीसीने विकास कालावधी किमान तिन महिने विनाशुल्क वाढवून द्यावा आदी मुद्दे विचारात घेण्यात आले. वरील सर्व मुद्यांवरील धोरणात्मक बाबीस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंजुरीनंतरच मान्यता देण्यात येईल, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु व्हावेत : सुभाष देसाई